पंचायत समिती दर्यापूर

Panchayat Samiti Daryapur

महाराष्ट्र शासन

पंचायत समिती दर्यापूर, आपले स्वागत करीत आहे.

          महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये पंचायत समिती दर्यायापूरची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली.पंचायत समितीचे भौगोलिक क्षेत्रफळ ८१०७०.८८ हेक्टर असून पडीत क्षेत्रफळ ५७७३.५१ हेक्टर आहे.लागवडी खालील क्षेत्रफळ ७५२९७.३७ हेक्टर आहे.खरीप हंगामाचे क्षेत्रफळ ७३६७५.०१ हेक्टर असुन रब्बी हंगामाची क्षेत्र १५९८०.९० हेक्टर आहे.पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत  सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,३९,५९८ असून त्यापैकी ७१०९० पुरुष व ६७५०८ स्त्रिया आहेत.
           पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात एकूण १४९ गावांचा समावेश आहे.१४९ गावांपैकी १३३ गावे आबाद असून १५ गावे उजाड आहेत. एकूण ग्रामपंचायती  ७४ असून ३० स्ववतंत्र व ४४ गट ग्रामपंचायती आहेत.पंचायत समिती अंतर्गत एकूण १३३ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा द्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो.

            पंचायत समिती अंतर्गत एकूण १२९ शाळा कार्यरत असून त्यापैकी वर्ग १ ते ५ पर्यंतचे ८५ शाळा आहेत.वर्ग १ ते ८ च्या ४३ पुर्व माध्यमिक शाळा आहेत.जिल्हा परिषदचे १ हायस्कुल आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र ४ आहेत.ग्रामिण रुग्णालय १ असुन २३ आरोग्य उपकेंद्र आहेत.प्राथमिक स्वास्थ पथक १ आहे.७ आयुर्वेदिक दवाखाने कार्यरत असुन २ अलोपॅथिक दवाखाने आहेत.पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी १ चे १ व श्रेणी २ चे ७ असे एकुण ८ दवाखाने कार्यरत आहे.पंचायत समिती पंचायत समिती अंतर्गत कार्यरत अंगणवाड्यांची एकुण संख्या २०४ असुन त्यापैकी नियमित १९० व १४ मिनी अंगणवाडी केंद्र आहेत.

bdo photo

श्री.कालिदास रघुनाथ तापी 

मा.गटविकास अधिकारी

पंचायत समिती दर्यापूर

जाहिराती / महत्वाच्या सूचना

सन २०२४-२५ या वर्षात पंचायत समिती सेसफंडातून १४ समाजकल्याण २०%(टक्के) निधीतून 90%(टक्के) अनुदानावर मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशीन पुरवणी व ५%(टक्के) दिव्यांग योजनेचा थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने लाभ देण्याबाबत.

एका दृष्टीक्षेपात

तालुक्याचे नाव : दर्यापूर

जिल्हा : अमरावती

देश : भारत

राज्य : महाराष्ट्र

विभाग : विदर्भ

क्षेत्रफळ : ८१०७०.८८ हे.

लोकसंख्या : १३९५९८

एकूण गावे : १४९

एकूण ग्रामपंचायती : ७४

एकूण उजाड गावे : १५

एकूण प्रभाग :

एकूण गण :

सार्वजनिक सुविधा

प्राथमिक आरोग्य केंद्र : ४

सामान्य रुग्णालय : १

जि. प. प्राथमिक शाळा : ८५​

जि. प. माध्यमिक शाळा : ४३

आरोग्य उपकेंद्र : २३

अग्निशमन केंद्र :

अंगणवाडी : २०४

टपाल :

विज उपकेंद्र :

एकूण बँक : ४०

श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस

माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे

माननीय उपमुख्यमंत्री

श्री.अजित आशाताई अनंतराव पवार

माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार कमल भगवानराव गोर

माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे

माननीय पालक मंत्री

श्री. योगेश ज्योती रामदास कदम

माननीय राज्य मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. बळवंत सीताबाई बसवंत वानखडे

माननीय खासदार, अमरावती लोकसभा मतदारसं

श्री. गजानन मोतीराम लवटे

माननीय आमदार, दर्यापूर विधानसभा मतदारसंघ

श्री. एकनाथ डवले भा.प्र.से.

प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्रीमती.श्वेता सिंघल , भा.प्र.से.

विभागीय आयुक्त, अमरावती विभाग

श्री. सौरभ कटियार, भा.प्र.से.

जिल्हाधिकारी अमरावती

सौ. संजीता महापात्र भा.प्र.से.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती

पर्यटन स्थळे

आमच्या तालुक्याला काय खास बनवते

आनंदेश्वर मंदिर, लासूर दर्यापुर


आनंदेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर गावात असलेले आनंदेश्वर मंदिर हे प्राचीन दगडी स्थापत्यकलेचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. पूर्णा नदीच्या काठावर वसलेले हे काळ्या दगडाचे मंदिर दुरून एखाद्या किल्ल्यासारखे दिसते.

भगवान शिवाला समर्पित, हे मंदिर १३ व्या शतकाच्या आसपास बांधले गेले असे मानले जाते. त्याची स्थापत्य शैली हेमाडपंती डिझाइनची आठवण करून देते, ज्यामध्ये गुंतागुंतीचे दगडी कोरीवकाम आणि उंच व्यासपीठ आहे. मंदिराच्या आतील भागात १२ उघडे खांब आणि भिंतींमध्ये ६ खोदलेले आहेत, एकूण १८ खांब आहेत जे गणितीय अचूकता आणि खगोलशास्त्रीय महत्त्व यांचे मिश्रण दर्शवितात.

आनंदेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून मान्यता दिली आहे. हे या प्रदेशातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे, जे पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करते, विशेषतः महाशिवरात्रीसारख्या उत्सवांमध्ये.

या प्राचीन चमत्काराचा शोध घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी, हे मंदिर दर्यापूरपासून अंदाजे १४ किलोमीटर आणि अमरावतीपासून सुमारे ६७ किलोमीटर अंतरावर आहे. दर्यापूर ते म्हैसांग मार्गाने हे ठिकाण उपलब्ध आहे

महिमापुर ची ऐतिहासिक सात मजली पायविहिर

महिमापूरची सातमजली पायविहीर अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील तेराव्या शतकातील रहस्यमयी विहीर आहे. दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर. पाहताक्षणी प्रेमात पडावे अशी ही पुरातन धरोहर. ८०० वर्षांनंतरही त्या ऐतिहासिक विहिरीचे गूढ अनुत्तरित आहे.अमरावती जिल्ह्यातील महिमापुरात आहे तेराव्या शतकातील रहस्यमयी विहीर महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध गडकिल्ले, वास्तू आहेत. त्या पुरातन वास्तूंशी सातवाहनांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत अनेकांचे नाते आहे. ज्या वास्तूंचा इतिहासइतिहासकारांनी मांडला, त्या प्रसिद्ध झाल्या. मात्र, अनेक पुरातन वास्तू प्रसिद्धीपासून वंचित राहिल्या. त्यापैकी एक म्हणजे दर्यापूर तालुक्यातील महिमापूरची सातमजली पायविहीर. पाहताक्षणी प्रेमात पडावे अशी ही पुरातन धरोहर. ८०० वर्षांनंतरही त्या ऐतिहासिक विहिरीचे गूढ अनुत्तरित आहे.अमरावतीहून सुमारे ४० किमी अंतरावर आसेगाव पूर्णाहून दर्यापूर मार्गाने वळले की, एक टुमदार गाव दिसते. ते म्हणजे महिमापूर. विहीर कुठाय, अशी विचारणा करताच पुढील भव्य वास्तूकडे अंगुलीनिर्देश केला जातो अन् अवचितच तोंडातून उच्चार निघतो, वाह, क्या बात है! आपल्या जिल्ह्यातील या ऐतिहासिक पायविहिरीबाबत आपल्याला माहिती नव्हते? आपण कपाळकरंटे की काय, अशी काही क्षण आपली स्थिती होते. या विहिरीचे बांधकाम अंदाजे तेराव्या शतकातले आहे, असा फलक सुरुवातीला लक्ष वेधून घेतो. मात्र, विहिरीचा इतिहास कुणालाही माहिती नाही. तो गावात कुणीही सांगत नाही. विहिरीची निर्मिती आधी झाली, त्यानंतर गाव वसले असेल, अशी शक्यता केवळ व्यक्त केली जाते. अशी आहे रचना महिमापूरच्या या ऐतिहासिक विहिरीचा आकार चौकोनी आहे. सुमारे ८० फूट खोली. तर रुंदी ४० मीटर बाय २५ मीटर. विहिरीत उतरण्यासाठी ८५ पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या मार्गावर किल्ल्याच्या प्रवेशद्वारासमान कमानी आहेत. प्रवेशद्वारावर दोन पुष्पे दगडात कोरलेली. आत शिरल्यावर विहिरीच्या चारही बाजूंनी फिरता येईल, बसता येईल, अशी व्यवस्था आहे. बांधकाम संपल्यानंतर तळाशी चहुबाजूंनी ओट्यासमान रचना. आता या विहिरीला पाणी नसल्याने अगदी तळाशीदेखील जाणे शक्य आहे. स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना असलेली भव्य ऐतिहासिक सातमजली पायविहीर आजही दिमाखत उभी आहे. नागपूरच्या पुरातत्व विभागाच्या लेखी राज्य संरक्षित स्मारक म्हणून त्या विहिरीची नोंद आहे. कपारीचे गूढ उकलेना महिमापूरच्या या विहिरीचे तळापर्यंतचे बांधकाम पाहता येते. अभ्यासकांच्या निष्कर्षानुसार, पूर्वी या विहिरीवर दोन मजल्यांचे बांधकाम होते. तेराव्या, चौदाव्या शतकातील युद्धस्थिती पाहता, संरक्षणासाठी वऱ्हाडात अनेक वास्तू उभारल्या गेल्या. त्यातील ही एक वास्तू असावी, असा होरा आहे. त्याकाळी पाहणाऱ्याला ही विहीरच आहे. हे लक्षातच येणार नाही, अशी त्या बांधकामाची रचना होती. वरील दोन मजले आता कोसळल्याने विहिरीचे आतील बांधकाम थेट वरून पाहता येते. तब्बल ७०० ते ८०० वर्षांनंतर ते शाबूत आहे. विहिरीच्या आत आजदेखील कपारीसमान गूढ रचना आहे, त्या कपारी नेमक्या कशासाठी होत्या, ते अद्यापही अनुत्तरित आहे. महिमापूरच्या विहिरीचे वैशिष्ट्य स्थापत्यशैलीचा अजोड व अनोखा नमुना असलेली महिमापूरची ऐतिहासिक सातमजली पायविहीर यादव कालीन आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ती बांधली असावी, असे म्हटले जाते. विहिरीत खजिना दडलेला आहे, अशा अनेक दंतकथादेखील प्रचलित आहेत. ही विहीर पाहताना राजवाडा पाहिल्याचा भास होतो. या विहिरीला १२ दरवाजे आहेत. विहिरीचे कोरीव काम एवढे अद्भुत आहे की, ते पाहून सारे थक्क होतात. विहिरीचा उद्देश वाटसरूंसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे व निवारा हाच होता, असे सांगितले जाते.तसेच १३ व्या शतकात देवगिरी किल्ला कारंजा किल्ला ते अचलपूर चा किल्ला असा राजेशाही मार्ग महिमापूर वरून जात होता तेव्हा राजे व त्यांचे सैन्य विहिरी मध्ये विसावा घेत होते असे म्हटले जाते. .

छायाचित्र दालन

यशोगाथा

अंगणवाडी बांधकाम पुर्वस्थिती
ईटकी ग्रामपंचायात अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या प्राणांगणात मालकीची जागा असून या जागेमध्ये अंगणवाडीची जुनी ईमारत होती. या ईमारतीच्या आजूबाजूने लहान मुला-मुलींना खेळण्याकरिता प्राणांगण नव्हते. त्यामुळे मुले-मुली व अंगणवाडी सेविका व शिक्षिका यांना अडचण निर्माण होत होती.
Click Here
अंगणवाडी बांधकाम ईमारतीची पूर्वतयारी फोटो
Click Here
ग्रामपंचायत व ग्रामसभा
मा. गटविकास अधिकारी व विविध विभाग प्रमुख ग्रामपंचायत यांची सभा घेतांना
Click Here
ग्रामपंचायत इटकी अंतर्गत कामे
आरोग्य तपासणी कक्ष, अंगणवाडी केंद्र व इतर कामे
Click Here

माझी वसुंधरा

माझी वसुंधरा हा सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाद्वारे हाती घेण्यात आलेला एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांच्या परिणामांबद्दल जागरूक करण्यासाठी.

जल जीवन मिशन

जल जीवन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे.जो २०१९ सुरु करण्यात आला.या योजने अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट् आहे.

प्रधान मंत्री आवास योजना - ग्रामीण

स्वातंत्र्यानंतर लगेचच निर्वासितांच्या पुनर्वसनाने देशातील सार्वजनिक गृहनिर्माण कार्यक्रम सुरू झाला आणि तेव्हापासून, गरिबी निर्मूलनाचे साधन म्हणून सरकारचे हे एक प्रमुख लक्ष केंद्रीत क्षेत्र आहे.